२०२१ हे वर्ष भारतासाठी महत्वपूर्ण वर्ष आहे येत्या १५ ऑगस्टला भारत आपल्या स्वतंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करत आहे तर ह्याच वर्षी भारत पाकिस्तानमध्ये १९७१ साली झालेल्या युद्धाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत,भारत सुवर्ण विजय वर्ष म्हणून साजरे करत आहे.साहस,शौर्य,प्रतिष्ठित भारतीय सशस्त्र दलला मनाचा मुजरा…
१९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धाला समजून घेण्यासाठी पहिले ह्या युद्धाची पाश्र्वभूमी काय आहे हे समजून घेणे गरजेचे आहे जर तुम्ही पार्श्वभूमी समजून नाही घेतली तर ह्या भागातले तुम्हाला काहीच कळणार नाही,ह्या युद्धाची पार्श्वभूमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
गंगा अपहरण
लंडनमध्ये असणाऱ्या रॉ गुप्ताचारकडून एक बातमी आली,पाकिस्तानचे राष्ट्रपती आणि लष्करप्रमुख याह्या खान हे पूर्व पाकिस्तानवर लवकरच लष्करी हल्ला करणार आहेत.रॉची सर्व तयारी हि पाकिस्तानच्या निवडणूक जाहीर होण्यागोदरच झाली होती.रॉ आता पूर्व पाकिस्तानमधील सर्व घडामोडींवर लक्ष ठेवत होती.पाकिस्तानला जर पूर्व पाकिस्तानमध्ये जायचे असाल तर त्यांना भारताच्या हद्दीतून हवाई प्रांतातून जावे लागत होते.हे संबंध तोंडाने आता गरजेचे होते पण ते कसे तोडायचे असा विचार रॉचे काव हे करत होते आणि त्यांच्याकडे एक गुप्त बातमी आली,आयएसआय च्या दोन गुप्तचरांना सीमा सुरक्षा दलाच्या म्हणजेच बीएसएफच्या जवावानांनी भारतात घुसखोरी करताना पकडले आहे.त्यांचा पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा मुलगा राजीव गांधी हे जे विमान उडवणार असतील तेच विमान अपहरण करून पाकिस्तानला नेयचे होते आणि भारताला कोंडीत पकडायचे.आणि रॉप्रमुख काव यांच्या डोक्यात भन्नाट कल्पना आली त्यांनी पाकिस्तानचा डाव त्यांच्यावरच उलटवण्याचा डाव आखला.त्या दोन आयएसआय गुप्तहेरांना रॉचा हस्तक बनवण्यात आले.
३० जानेवारी १९७१ ला भारतीय ताफ्यातले फॉकर एफ-२७ (गंगा) ह्या विमानाचे अपहरण करून ते लाहोरला नेण्यात आले,आणि त्याबदल्यात भारताकडे कैदेत असलेले ३६ आतंकवादी याना मुक्त करण्यात यावे अशी मागणी ठेवण्यात आली.आता झाली पंचाईत पाकिस्तानने भारताला कोंडीत पकडले म्हणून पाकिस्तानी जनता लाहोर हवाईअड्ड्यावर येऊ लागली भारतविरोधी घोषण्या देण्यात आल्या.ते दोन आतंकवादी पत्रकारांना जाहीर मुलाखती देऊ लागले,सर्वत्र चर्चा सुरु झाली पाकिस्तानी जनता उत्सव साजरा करत होती.ज्यांनी गंगा हे विमान अपहरण केले होते त्यांचा मस्त पाहुणचार चालला होता.१ फेब्रुवारी १९७१ दिवशी त्या आतंकवाद्याची चर्चा पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री झुल्फिकार भुट्टो याच्यासोबत झाली आणि अपहरण केलेले सर्व प्रवासी यांना सोडण्यात आले.आणि गंगा ह्या विमानाला आयएसआयने आग लावली.भारताचे नाक कापण्याचा तो डाव होता पण भारत तरी काय करणार होता निषेध! पण हे प्रकरण जसं दाखवलं जात होतं तसं ते होतं का? ह्या नाट्यथराराचा मास्टरमाइंड होते रॉ प्रमुख काव. गंगा विमानाचे अपहरण करून लाहोरला घेऊन जाणे तिथे जाऊन सर्व पत्रकारांना त्या आतंकवाद्यांमार्फत मुलाखती देणे आणि सर्वाच्या सर्व भारतीयांना त्यांच्या केसालाही धक्का न लावता भारतात परत सुखरूप आणण्याचा तो डाव होता.आणि ते २ आयएसआयचे आतंकवादी हे रॉचे हस्तक होते.आता पाकिस्तानची कोंडी झाली भारताकडून संयुक्त राष्ट्रात पाकिस्तान कसा आतंकवाद्याला संरक्षण देऊन भारताविरुद्ध कारवाया करत हे अनेक पुराव्यांसह सिद्ध करण्यात आले आणि पाकिस्तानच्या सर्व हवाई जहाजांना भारतीय हवाई हद्दीतून ये-जा करण्यास बंदी घातली गेली.आणि ज्या विमानाला आग लावण्यात आली होती ते विमान भारताच्या ताफ्यातून बादच करण्यात आले होते अपहरणाच्या काही दिवस आधीच ते विमान पुन्हा सेवेत घेण्यात आले होते.हीच आहे आपली रॉ.
भुज हवाई अड्डा
पूर्व पाकिस्तानमध्ये पाकिस्तान लष्कराचा नंगानाच चालू होता बंगाली जनतेला हालहाल करून मारले जात होते भररस्त्यात मुलींचे बलात्कार होत होते,ह्या जाचाला घाबरून कित्येक बंगाली जनता आता भारताच्या हद्दीत शरणासाठी येत होते आणि ह्यांची संख्या वाढतच चालली होती. १० लाख २० लाख, ३० लाख, ४० लाख आता मात्र भारताच्या तिजोरीवर ह्याचा परिणाम होऊ लागला.५ नोव्हेंबर १९७१, सकाळी ८ वाजता वॉशिंग्टनमध्ये तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन,किसिंजर आणि हाल्डेमन यांच्यात चर्चा चालू होती पूर्व पाकिस्तानमधील होत असलेल्या नरसंहाराची.ह्या चर्चेत निक्सन म्हणाले धिस इज द पॉईंट व्हेन शी(इंदिरा गांधी) इज ए बीच.अमेरिका हि पहिल्यापासून पाकिस्तानच्या बाजूनेच होती ते भारताची कोणतीही मदत करत नव्हते उलट भारतावरच दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते.पण म्हणतात ना झोपलेल्या वाघाला कधी डिवचू नये कदाचित तो योग्य संधीची वाट पाहत असेल आणि ३ डिसेंबर १९७१ संध्याकाळी पाकिस्तान हवाई दलाने भारताच्या ११ हवाईअड्ड्यांवर बॉम्बने हल्ले करायला सुरवात केली.ह्या ऑपेरेशनला पाकिस्तानने ऑपेरेशन चंगेझ खान हे नाव दिले.
भारतातील अमृतसर,अंबाला,आग्रा,अवंतिपुर,बिकानेर,हलवार,जोधपूर,जैसलमेर,पठाणकोट,भुज,श्रीनगर आणि उत्तरलाई ह्या हवाई अड्ड्यांवर नॅपलम बॉम्बने हल्ले करून भारतीय सेनेच्या हवाई उडाणपट्टी उध्वस्त करण्याचा बेत पाकिस्तान हवाई दलाचा होता आणि त्यांनी ते उध्वस्तहि केले,पण आग्रामध्ये येऊन त्यांनी बॉम्बहल्ला केला होता ह्याचा विचार नव्हता केला आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी भारतीय रेडिओवरून भारत पाकिस्तान युद्धाला सुरवात झाली आहे असा संदेश भारतीयांच्या नवे दिला.भारताला ऑपेरेशन चंगेझ खानला उत्तर तर देयचे होते पण कसे देणार कारण सर्व फॉरवर्ड एअर बेसेस वर बॉम्बहल्ला झाला होता.ते दुरुस्त करण्याचे कामही चालू होते पण सततच्या हल्ल्यामुळे वेळही जात होता आणि सर्वात जास्त बॉम्बहल्ले हे गुजरातमधील भुज ह्या हवाई अड्ड्यावर करण्यात आले होते जवळ जवळ १८ नेपालम बॉम्ब एकट्या भुज एअर बेसवर करण्यात आले होते.अचानक झालेल्या ह्या हल्ल्यामुळे उडाणपट्टी दुरुस्त करण्यासाठी मनुष्यबळ अपुरे पडत होते.भुज ह्या हवाई अड्ड्यावर तैनात असलेले भारतीय हवाई दलाचे स्क्वाड्रन लीडर विजय कर्णिक ह्यांच्या लक्षात आले हवाईपट्टी दुरुस्त करण्यासाठी खूप मनुष्यबळाची गरज आहे म्हणून त्यांनी भारतीय सीमा सुरक्षा दलाची मदत मागितली परंतु युद्धजन्य परिस्थती असल्या करणारे जास्त जवान एकाच ठिकाणे देणे हे परवडण्याजोगे नव्हते जेमतेम १०० जवान विजय कर्णिक ह्यांना देण्यात आले परंतु तेपण पुरेसे नव्हते.
म्हणून त्यांना एक कल्पना आली जवळच्या असलेल्या माधापूर गावच्या लोकांकडे त्यांनी मदत मागितली त्यांना प्रोत्साहित करून ३०० महिला ह्या फक्त आणि फक्त देशावर आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी तयार झाल्या.युद्ध पुकारले असताना सारखे बॉम्बहल्ले होत असताना कोणतीही हवाई मदत भेटत नसताना ह्या महिला जीवाची पर्वा ना करता तयार झाल्या कित्येक महिलांना लहान लहान मुले होती तरीही त्या तयार झाल्या,काम सुरु झाले पहिल्या दिवशी त्या महिलांना जेवायला सुद्धा मिळाले नाही पण कोणतीही तक्रार न करता त्या काम करत राहिल्या दुसऱ्या दिवशी मात्र जवळच्या जावांकडून मंदिरातून त्यांना जेवण भेटू लागले.
काम जोखमीचे होते,पाकिस्तान सीमा जवळच होती मोकळ्या आकाशाखाली त्या महिला न थांबता काम करत होत्या भारतीय हवाई दलाच्या जवानांना जर पाकिस्तानचे विमान येण्याचा काही सुगावा लागला तर लगेच भोंगा वाजवला जाई आणि सर्वाना एका सुरक्षित छत्राखाली आणले जाई.पाकिस्तानी हवाई दलाला वरून खाली काम करत असलेल्या महिला दिसू नयेत ह्यासाठी त्यांना हिरव्या रंगाची सारी नेसण्यास सांगितल.जेणेकरून जवळच्या गवताच्या रंगाशी मिळतेजुळते राहील,जशी जशी हवाईपट्टी पूर्ण होत जाई तिला शेणाचे सारवून हिरव्या रंगाची केली जाईल अश्या प्रकारे पाकिस्तानी हवाई दलाला चकवून हि हवाई पट्टी अवघ्या ७२ तासात पूर्णपणे दुरुस्त करून झाली.जीवाची पर्वा न करता मातृभूमी हीच सर्वोपरी फक्त आणि फक्त देशभतीच्या भावनेपायी ह्या महिला आल्या होत्या,युद्ध संपल्यावर इंदिरा गांधींनी ह्या ३०० महिलांना आर्थिक बक्षिसे देऊ केली पण त्यांनी स्वीकारली नाहीत त्या म्हणाल्या आम्ही कोणतेही पैसे घेणार आंही आम्ही जे केले ते भारतासाठी केले आपल्या मातृभूमीसाठी केले.सलाम आहे त्या महिलांना ज्यांनी स्वतःच्या जेवाच विचार न करता हे देशकार्य केले.
७२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर भुज हवाई अड्ड्यावरून एकामागून एक भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमाने पाकिस्तानमध्ये घुसून घुसून एक एक हवाई अड्डे बरबाद करून टाकले उध्वस्त बेचिराख करून टाकले.
लोंगेवालाचे युद्ध
४ डिसेंबर १९७१ लोंगेवाला पोस्ट, थार वाळवंट,राजस्थान भारतीय सेनेचे जवान रात्रीच्या वेळेस गस्त घालत होते त्यांना खूप वाहनांचा आवाज आला म्हणून ते भारत पाक सीमारेषेच्या जवळ गेले आणि माहिती अधीकृत झाली कि पाकिस्तानी फौजेकडून हत्यारबंद वाहने भारतात दाखल होत आहे,हि माहिती लोंगेवाला पोस्ट व पंजाब रेजिमेंट २३ व्या पलटणचे नेतृत्व करत असलेले मेजर कुलदीप सिंग चांदपुरी ह्यांना देण्यात आली.मेजर चांदपुरी हे आपल्या १२० सैनिकांसह तिथे लोंगेवालाचे नेतृत्व करत होते आणि बाकीची फौज हि १७ किलोमीटर लांब साधेवला येथे स्थित होती.मेजर चांदपुरी यांनी मोर्चेबांधणीला सर्वात उंच अश्या टेकडीची निवड केली होती जेणेकरून शत्रू जर आला तर त्याला आपण असलेल्या उंचीचा फायदा घेऊन त्यांना टिपता येईल.त्यांच्याजवळ २ मिडीयम मशीन गनचा एक सेक्शन आणि एल ६१ मोर्टरचा एक सेक्शन म्हणजे ३ मोर्टर होत्या.आणि दुसरीकडे पाकिस्तान ६५ रांगड्यांसह सीमेवर येत होता.पाकिस्तानने लोंगेवालाची लष्करी चौकी म्हंजे पोस्ट सहज कब्ज्यात घेऊन पुढे जैसलमेरवर धडक मारण्याचा बेत केला होता.पाकिस्तनाची २८०० सैनिकांची मोठी तुकडी ६५ रणगाडे आणि ५०० इतर वाहनासह समोर आली होती रात्रीची वेळ होती आणि १२.३० रात्री लढाईला सुरवात झाली भारतीय सैनिक हे जेमतेम १२० होते आणि त्यांच्याकडे हत्यारांचा पुरेसा साठाही उपलब्ध नव्हता आणि मदतीला भारतीय हवाई दलाला येईल अजून ५ तास बाकी होते.कुठल्याही प्रकारे मदत येणार नव्हती त्यांना मागे सरकता आले असते त्यांना वरिष्ठानी चौकी सोडून माघार घेणे अथवा चौकीवर बसून राहून हल्ला चढवणे ह्याच्या निर्णय मेजर चांदपुरी ह्यांच्यावर सोडला,पण मेजर चांदपुरी हे एक पाऊलही मागे न सरकत पाकिस्तानी सैन्याला प्रतिउत्तर देत होते सैनिकांना प्रोत्साहित करत होते.लोंगेवला चौकीला पाकिस्तानी सैन्याने वेढा घातला भारतीय जवान झुंज देत होते अक्षरशः त्यांनी पाकिस्तानच्या कमांडरचे तोंडाचे पाणी पळवले ते मेटाकुटीला आले.भारताचा एकही सैनिक जागेवरून हालत नव्हता सतत त्यांच्या चौकीतून गोळीबार चालू होता आणि जशी सूर्याची पहिली किरण आकाशात उधळण करत आली तेव्हाच भारतीय हवाई दलाची ४ हंटर विमाने पाकिस्तानच्या ताफ्यावर घिरट्या घालू लागली आणि बघताक्षणी भारतीय हवाई दलाकडून २३ रणगाडे आणि ५०० वाहनांचा चकणाचुर करून टाकला.
“चिड़ियों से मै बाज लडाऊ, गीदड़ों को मैं शेर बनाऊ
सवा लाख से एक लडाऊ, तभी गोबिंद सिंह नाम कहउँ”
गुरु गोविंद सिंह
अगदी असच काहीसं झाले असणार लोंगेवाला मध्ये कारण भारताचा एक एक सैनिक पाकिस्तानच्या १५-१५ सैनिकांवर भारी पडत होता.अक्षरशः भारतीय जवानांनी पाकिस्तानची दाणादाण उडवून दिली आणि हेच होत असताना पाकिस्तानचे कमांडर यांनी पाकिस्तान सैन्याला मागे फिरण्याचे आदेश दिले आणि पाकिस्तानी तुकडी माघारी फिरू लागली आणि त्यात वेळेला ह्या पाकिस्तानच्या सैन्याचे नशीब एवढा खराब कि भारतीय शर्मन रणगाड्याचे पथक रणगांवर हजार झाले आणि माघारी फिरत असलेल्या पाकिस्तानच्या सैन्याची आणखीनच परिस्थती वाईट करून टाकली.ह्या लढाईत भारताचे २ जवान शहीद झाले आणि पाकिस्तानचे २०० पेक्षा अधिक सैनिक मृत्युमुखी पडले.पाकिस्तान एवढ्या मोठ्या सैन्याचे आणि एवढ्या रणगाड्यांसह भारताची सीमा ओलांडून येणार होता हे कळण्यासाठी भारताला वेळ लागला ह्यात भारतीय हेरखात्याचे म्हणजेच रॉचे अपयश होते पंजाब रेजिमेंटने जे साहस दाखवलं ते वाखाणण्याजोगे आहे शत्रूला पाठ न दाखवता आहे त्या रसदेसह शत्रूची झुंज पंजाब रेजिमेंटने दिली होती. ह्याच घटनेवर बॉर्डर हा चित्रपट बनवण्यात आला आहे.
ऑपरेशन ट्रायडंट
ऑक्टोबर १९७१, ऑपेरेशन ट्रायडंट ह्या मोहिमेच्या २ महिने अगोदर तत्कालीन संरक्षण मंत्री जगजीवन राम,भारतीय नौदल प्रमुख एस एम नंदा आणि रॉ प्रमुख रामेश्वर नाथ काव यांच्यात एक बैठक झाली.भारतीय नौदलाला एक गुप्तबातमी कळली होती कि पाकिस्तानच्या कराची बंदरावर एक अत्याधुनिक अमेरिकन रडार प्रणाली बसवण्यात आली आहे जेव्हा भारतीय नौदल आणि हवाई दल लढाई दरम्यान जर पाकिस्तान वर हल्ला करण्यासाठी पश्चिमी किनारपट्टीवरून गेलं तर त्या रडार प्रणाली द्वारे पाकिस्तान आपल्यावर हल्ला करून आपल्याला नेस्तनाभूत करू शकत होतं ह्यासाठी ती प्रणालीवर हल्ला करणे गरजेचे होते पण हि बातमी खरी आहे का ह्याची सत्यता पडताळून पाहणे गरजेचे होते.हे काम भारतीय नौदलाचे जवान करू शकत नव्हते कारण त्यांना त्याप्रकारचे प्रशिक्षण दिले गेले नव्हते.हे काम फक्त रॉच करू शकणार होती ह्यात काही शंका नव्हती.कराची बंदरावर हल्ला करायचा म्हणजे खात्रीशीर नियोजन आणि कुठल्या कोपऱ्यात किती अँगलला प्रतिहल्ला प्रणाली ठेवली आहे माहित असणे गरजेचे होते आणि ह्यासाठी कराची बंदराची ब्लु प्रिंट,खात्रीशीर व्हिजुअल दस्तऐवज म्हणजे उच्च दर्जाच्या फोटोंची गरज होती आणि हे काम फक्त रॉ प्रमुख काव ह्यांच्याच तोडीचे होते.हि सर्व माहिती गोळा करण्यासाठी कुशल,निडर बुद्धिमान गुप्तहेरांची गरज होती.आणि मग ठरले कराची बंदरात घुसून सर्व माहितीती गोळा करायची आणि पुढे भारतीय नौदलाला पाठवायची.ह्यासाठी एक नियोजनबद्ध आखाड्याची गरज होती.काव आणि रॉ उपप्रमुख शंकरन नायर यांनी त्यांच्याजवळ असलेल्या टॉप गुप्तचराला बोलावण्यात आले.आणि काय करता येईल ह्यावर विचारविनिमय सुरु झाला अचानक त्या गुप्तचराला एक कल्पना सुचली दोन महिने अगोदर म्हणजे जुलै दरम्यान डॉक्टर कावसजी ह्यांची एक बोट जी भारत आणि कुवेतला पाकिस्तानच्या कराची बंदरावरून सागरीमार्गातून प्रवास करते त्या बोटीला भारताच्या कस्टम विभागाने अनधिकृतपणे मालाची हेरफार केल्याप्रकरणी एक खटला चालू होता,आणि कावसजी ह्याच्यावर मोठा दंड ठोठावला होता.प्लॅन असा होता कि ह्या बोटींमधून रॉचे दोन गुप्तचर प्रवास करतील आणि सर्व माहिती गोळा करून येतील पण ह्यात जोखीम होती पाकिस्तानची आयएसआय हि गुप्तचर यंत्रणा नव्याने कार्यक्षम झाली होती.काही कुठे माहिती लीक झाली तर गोची होणार होती,म्हणून काव यांनी कस्टममध्ये असलेल्या निकटवर्तीयांशी पत्रव्यवहार करून डॉक्टर कावसजी यांची बोट सोडण्यास सांगितले आणि दंडाची जी काही रक्कम असेल ती रॉच्या फुंडमधून देण्यात येईल असे कळवण्यात आले.रॉचे दोन गुप्तचर डॉक्टर कावसजी ह्यांच्या बोटींमधून प्रवास करणार होते आणि त्या दोन गुप्तहेरांची नवे होती रॉड आणि मॉरीयार्टी हि त्यांची काही खरी नवे नव्हती त्यांची खरी नावे राव आणि मूर्थी हि होती.राव हे शंकरन नायर यांचे नौदल सहाय्यक होते तर मूर्ती हे रॉच्या फोटोग्राफी विभागातून फोटोग्राफी तज्ञ होते.ह्या योजनेअंतर्गत रॉला समजले कि अमेरिका हे गुप्तपणे पाकिस्तानला हत्यारांचा पुरवठा करत होते, आणि युद्धासाठी पाकिस्तानला कराची बंदर हे अतिशय उपयुक्त होते.
रॉचे दोन गुप्तचर पाकिस्तानमध्ये दाखल होणार होते,भारत पाक युद्ध आता अटळ होते ह्यासाठी पाकिस्तान फौजेने बंदरावर चांगलाच बंदोबस्त लावला होता,प्रत्येक जहाजे,बोट,नौका मोठी मालवाहू जहाजे म्हणजे कार्गो शिप यांची कसून तपासणी चालू होती.डॉक्टर कावसजी यांच्या बोटीने भारताची सीमा सोडत आता कराचीच्या जवळ आली,काही वेळात त्यांची बोटहि कराची बंदरावर आली आणि तितक्यात पाकिस्तान सिआयडीच्या अधिकारी तिथे आणि डॉक्टर कावसजी ह्यांची चौकशी सुरु झाली.रॉड आणि मॉरीयार्टी हे आत बसले होते ते कोण आहेत हे विचारताच कावसजी याना आता घाम फुटला आता जर आपण पकडलो तर आपली काही खैर नाही.सिआयडी अधिकारी आत जात असतानाच डॉक्टर कावसजी यांनी त्या अधिकारयांना थांबवले आणि म्हणाले ह्या दोघांना कांजण्या झाल्या आहेत म्हणून त्यांना वेगळे ठेवले आहे तुम्ही जर त्यांच्या जवळ संपर्कात गेलात तर तुम्हालासुद्धा होतील.डॉक्टर कावसजी हे कराची बंदरावरून नेहमी जात असल्यामुळे त्यांच्यावर संशय करण्याचे काही कारण नाही ह्या विचाराने त्यांनी बोटीला आत जाण्यास परवानगी दिली.काही काळ असाच घालवला गेला आणि मध्यरात्री बोट पुन्हा प्रवासाला लागली,रॉड आणि मॉरीयार्टी यांनी सर्व सामान आपल्या खाटेखालून वर काढले दुर्बीण,कॅमेरा आणि कॅमेरा बोटीच्या छोट्याश्या खिडकीतून थोडा बाहेर काढला.आणि सर्व निरीक्षण करत करत ते सर्व लिहून ठेवत होते अचानक त्यांना कळले कि काहीतरी नवीन बांधकाम चालू आहे तिथे एक अँटी एअर क्राफ्ट बॅटरी बसविण्यात आली होती ह्याचा सरळ सरळ अर्थ होता पाकिस्तान युद्धासाठी संपूर्णपणे तयारी करत होता.कोणत्याही क्षणी तो भारतावर हल्ला करणार होता.रॉड आणि मॉरीयार्टी यांनी पटापट सर्व तटबंद्यांचे,तोफांच्या अड्ड्यांचे,काही क्षेपणास्त्र नौकांचे फोटो काढले जवळ जवळ अर्ध्या तासानंतर ते तिथून निघून गेले.
दुसऱ्या दिवशी दुपारी बोट तिथून कराची बंदरावरून कुवेतच्या दिशेने निघाली.रॉड आणि मॉरीयार्टी हे कुवेतमध्ये पोचताच तेथून लगेच कुवेतमधील भारतीय दूतावासात म्हणजे इंडियन एम्बसीमध्ये गेले तिथे त्यांनी तो कॅमेराचा रोल आणि काही कागदपत्रे लवकरात लवकर दिल्लीला पाठवण्यास सांगितले,आणि राव आणि मूर्ती हे दुसऱ्या दिवशी विमानाने प्रवास करून कुवेतून भारताकडे निघाले.रोल पाठवल्या त्या दुसऱ्या दिवशी सकाळी संरक्षण मंत्री जगजीवन राम ह्यांच्या टेबलवर अर्जेंट नावाचे एक इन्व्होलोप होते त्यात मूर्ती यांनी कॅमेरातून टिपलेली आख्या कराची बंदराची माहिती होती कुठे काय कुठल्या दिशेने काय ठेवले आहे सगळं काही त्यात होत.भारताकडे पहिल्यांदा कराची बंदराच्या आतील सर्व माहिती होती,ह्यामुळे भारतीय नौदलाला सर्व सरंक्षणार्थ केलेल्या मोर्चेबांधणीची इतंभूत माहिती आज भारताकडे होती,तसेच पाकिस्तानच्या वॉर शिप्स कुठे आहेत त्यांचे तेलाचे साठे कुठे आहेत गॅस पाईपलाईन कुठे आहेत सर्वांच्या सर्व माहिती फोटोग्राफ आता भारताकडे होते.
भारताचे नौदल प्रमुख ऍडमिरल एस.एम.नंदा आणि पश्चिमी तटाचे नेतृत्व करत असलेले व्हाईस ऍडमिरल एस.एम.कोहली यांनी पाकिस्तानच्या एका बंदरावर हल्ला करून संपूर्णपणे उध्वस्त करण्यासाठी एक मोहीम आखली नाव होतं ‘ऑपरेशन ट्रायडंट’.ह्या मोहिमेसाठी मिसाईल बोट स्क्वाड्रन मधल्या ३ विद्युत क्लास मिसाईल बोट निवड झाली पण त्या कमी वेळात जास्त अंतर कापू शकत नव्हत्या ह्यासाठी त्यांना लढाऊ जहाजाच्या मागे बांधून न्यावे लागणार होते.कराची पासून काही अंतर जवळ आल्यावर ह्या मिसाईल बोट ला वेगळे करून कराची बंदरावर हल्ला करण्याचे नियोजन होते. ह्या मोहिमेसाठी आयएनएस निपत,(आयएनएस म्हणजे इंडियन नेव्ही शिप) आयएनएस निर्घात आणि आयएनएस वीर ह्या तीन मिसाईल बोटींची निवड करण्यात आली प्रत्येक बोटीवर रशियन बनावटीची पी १५ टर्मिट ह्या पृष्ठभागावरुन जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र म्हणजे मिसाईल बसवण्यात आले,ह्या तीन बोटींसह भारताच्या शस्त्रसज्ज असलेले लहान संरक्षक जहाज आयएनएस किलतान आणि आयएनएस कचाल ह्यासोबत भारताचे फ्लीट टँकर आयएनएस पोषक ह्या बोटींचंसुद्धा समावेश करण्यात आला,आणि ह्या गटाचे नेतृत्व करणार होते कमांडर बबरू भान यादव.
४ डिसेंबर १९७१, गुजरातमध्ये असलेल्या ओखा ह्या भारतीय नाविक तळावरून भारताचे नौदल सर्व आयएनएस नौकांसह कराची बंदराच्या दिशेने निघाले.ह्या नौका बाणाच्या आकारात पुढे जात होत्या काही वेळात ह्या नौकानी सौराष्ट्र किनारपट्टीला वळसा घालून पुढे उत्तरेला निघाल्या.ह्या भारतीय नौकांचा मुख्य हेतू होता पाकिस्तानच्या कराची बंदराला आणि पाकिस्तानी लढाऊ नौकांना उध्वस्त करून कराची बंदराला आग लावणे.कराची बंदरापासून ६०किमी लांब असलेल्या आयएनएस निर्घातला रडारच्या संपर्क झाला.आयएनएस निर्घातपासून हे टार्गेट ४० किमी लांब होते.ह्या टार्गेटची पुष्टी करण्यात आली सर्व भारतीय नौका यांच्यादरम्यान आपापसात संपर्क करून आयएनएस निर्घातला समोरच्या टार्गेटवर क्षेपणास्त्र सोडून हल्ला करण्याची आज्ञा मिळाली तसेच लगेच आयएनएस निर्घातने टार्गेट लॉक केले आणि मिसाईल लाँच केले आणि पहिल्याच मिसाईलने आपला टार्गेट यशस्वीरीत्या टिपला. आणि ते टार्गेट होते पीएनएस खैबर.
पीएनएस खैबर हि पाकिस्तानची सर्वात शक्तिशाली लढाऊ वर्गातील विध्वंसक असे जहाज होते.हे जहाज भारतीय नौसेनेच्या आयएनएस निर्घातने रात्री १०:४५ वाजता एका क्षणात उध्वस्त करून टाकले.आयएनएस निपत आणि आयएनएस वीर हे उत्तरेकडे पुढे जात होते.पीएनएस मुहाफिझ हे अमेरिकन बनावटीची माईन स्वीपर क्लास जहाज होते.रात्री ११ वाजता आयएनएस निपतने पाकिस्तानच्या मालवाहू जहाज जे पाकिस्तानसाठी हत्यारे घेऊन जात जात होते ह्या जहाजावर क्षेपणास्त्र डागले,आणि त्यासोबत असणाऱ्या पीएनएस शाह जहाँ ह्या जहाजावरसुद्धा क्षेपणास्त्र डागले गेले आणि दोन्ही जहाजे उध्वस्त झाली.रात्री ११ वाजून २० मिनीटांनी आयएनएस वीरने पीएनएस मुहाफिझ ह्या जहाजावर हल्ला केला आणि अवघ्या पाच मिनटांमध्ये पीएनएस मुहाफिझ समुद्रात बुडाली.
याचदरम्यान आयएनएस निपत कराची बंदराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले आणि बंदरावर असलेले केमारी तेल साठवण्याच्या टाक्यांवर लक्ष्य केलं.कराची बंदरापासून २६ किमी लांब असलेल्या आयएनएस निपतने दोन क्षेपणास्त्र त्या तेल साठा असलेल्या टाक्यांवर सोडले एका क्षेपणास्त्र आपला वेध नाही साधता आला पण दुसऱ्या क्षेपणास्त्राने वेध साधला आणि बघता बघता संपूर्ण बंदराला आग लागली आणि काही मिनटांमध्येच संपूर्ण बंदर हे आगीच्या विळख्यात सापडले.परिणामी तेलाच्या कमतरतेमुळे पाकिस्तानी विमानेही उडू शकणार नव्हती.कराची बंदर आता धुराच्या काळोख्यात होरपळत होते.आणि ओखा भारतीय नाविक तळावर एक संदेश आला ‘अंगार’ म्हणजे मोहित फत्ते झाली.आता सर्व भारतीय नौका भारताच्या दिशेने परत चालल्या होत्या.
रॉने दिलेल्या उत्तम आणि खात्रीशीर माहितीमुळे भारतीय नौदलाला कराची बंदर उध्वस्त करण्यास मदत झाली. आणि ४ डिसेंबर १९७१ च्या मध्यरात्री भारतीय नौदलाने कराची बंदरावर हल्ला करून कराची बंदरावरील सर्व तेलाचे साठे,गॅस पाईपलाईन,वॉर शिप अँटी एअर क्राफ्ट प्रणाली,रडार सिस्टिम सर्वांच्या सर्व आग लावून सुफडा साफच करून टाकला.
४ डिसेंबरला भारतीय नौदल कराचीमध्ये अक्षरशः दिवाळी साजरी करत होते.बरं हे झालं पाकिस्तानच्या पश्चिमेकडील क्षेत्राचं पूर्वेकडे पण भारतीय नौदलाचा डंका वाजत होता.पूर्वेकडे बंगालच्या खाडीत पाकिस्तानची समुद्री नाकाबंदी करून थांबला होता भारतीय नौदलाचा मनाचा तुरा आयएनएस विक्रांत.
आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाचे मॅजेस्टिक क्लास एअरक्राफ्ट कॅरियर होते ह्या जहाजावरुन भारतीय हवाई दलाचे विमाने थेट समुद्रातून आकाशाकडे झेप घेऊ शकत होती.आणि हे जहाज भारतीय नौदलाने बंगालच्या खाडी उतरवले आणि पूर्व पाकिस्तानमध्ये जाण्यासाठीचा समुद्री मार्गच बंद करून टाकला.
भारतीय हवाई दलाने पहिले भारताच्या हद्दीमधून विमाने जाण्यास बंदी केली होती आणि आता समुद्री मार्गपण बंद करून टाकला आता पश्चिम पाकिस्तानमधून पूर्वी पाकिस्तानमध्ये रसद मदत पोहचवायची कशी ह्या विचाराने पाकिस्तानची डोकेदुखी झाली आणि मग त्यांनी अमेरिकेकडे भिका मागायला गेले आणि अमेरिका तर पहिल्यापासूनच पाकिस्तानच्या बाजूने होती झालं अमेरिकेने भारतावर दबाव टाकण्यास त्यांची एक जहाज बंगालच्या खाडीत उतरवले.मग भारताने रशियाकडे मदत मागितली अमेरिका आणि रशिया हे एकमेकांचे कट्टर शत्रू आणि १९६७ साली भारत रशिया मध्ये मैत्रीपूर्ण करार झाला होता कधी जर भारतावर कोणी चालून आले तर तुम्ही आम्हाला मदत करणार.ह्याच करारांतर्गत रशियाने पण एक जहाज समुद्रात उतरवले आणि अमेरिकन जहाजाला ब्लॉक करून टाकले.
आता तर पाकिस्तानची पाक तंतरली.बंगालच्या खाडीत त्यांचा बाप आयएनएस विक्रांत हिमालयासारखा एकटा उभा होता.हीच नौदलीय नाकाबंदी तोडण्यासाठी पाकिस्तानने आपली सगळ्यात शक्तिशाली नाविन्यपूर्ण तंत्रज्ञांसह बनवलेली अमेरिकन बनावटीची पीएनएस गाझी हि पाणबुडी पाण्यात उतरवली ह्या पाणबुडीचे उद्देश्य हेच होते कि समुद्राखालून वळसा टाकून विशाखापट्टणमच्या हद्दीत जाऊन आयएनएस विक्रांतला पाण्या बुडवणे आणि भारतीय नौदलीय नाकाबंदी तोडून टाकून थेट पूर्व पाकिस्तानमध्ये जाणारा समुद्री मार्ग मोकळा करावा. पण झालं भलतंच पीएनएस गाझी ४ डिसेंबरच्या मध्यरात्री रहस्यमय परिस्थितीमध्ये बुडाली.ह्यात अनेक वाद आहेत कोण म्हणत आहे पीएनएस गाझीला आयएनएस राजपूतने उध्वस्त करून समुद्रात बुडवली तर पाकिस्तानचे म्हणणे आहे कि पाणबुडीमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गाझी पाण्यात बुडाली.
एवढा भयंकर हल्ला झाल्यानंतर पाकिस्तान हाय अलर्ट जारी केला.६ डिसेंबर १९७१ ह्या दिवशी सकाळी ६ वाजून ४५ मिनीटांनी पाकिस्तानच्या हवाई दलातील फॉकर ह्या लढाऊ विमानाने भारताचे लढाऊ जहाज समजून स्वतःच्याच पीएनएस झुल्फिकार ह्या जहाजावर हल्ला केला.एवढी दहशत पाकिस्तानच्या हवाई आणि नौदलामध्ये भारतीय नौदलाने निर्माण केली होती.
ह्या हल्ल्यात पाकिस्तानचे अनेक नाविक मारले गेले,भारतीयांची एकही सैनिक आणि कोणताही अपघात झाला नाही.आणि हाच ४ डिसेंबर हा दिवस भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो,येत्या डिसेंबरला ५० वर्षे पूर्ण होणार आहेत.
ऑपरेशन पायथॉन
भारतीय सेनेने ऑपरेशन ट्रायडंट नंतर तीन दिवसांनी अजून एक मोहीम सुरु करण्याचा निर्णय घेतला.आणि ती मोहीम होती ऑपरेशन पायथॉन ह्या मोहिमेचं नियोजन करण्याचे कारण हेच होते कि ऑपरेशन ट्रायडंट दरम्यान जेवढा विनाश कराची बंदराला होणे अपेक्षित होते तितके ते झाले नाही.कराची बंदराचा संपूर्णपणे सुफडा साफ करण्याच्या हेतूने ऑपरेशन पायथॉन ह्या मोहिमेची आखणी करण्यात आली.
९ डिसेंबर १९७१ च्या रात्री १०:०० वाजता एक भारतीय नौदलाचा एक लहान समूह चार क्षेपणास्त्रासह आयएनएस विनाश आणि बहुउद्देशीय फ्रिगेट आयएनएस तलवार आणि आयएनएस त्रिशूल हे मनोरा ह्या बेटाजवळ आले.पुढे जात असताना समुद्रात गस्त घालणारी पाकिस्तानचे एक जहाज दिसले.भारतीय नौकानी वेळ न दवडता त्या पाकिस्तानी जहाजाला उध्वस्त करून टाकले.
कराची बंदरावर जात असताना आयएनएस त्रिशूलच्या इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलिअन्स आणि रडार मध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ते बंद पडले.काही वेळाने रात्री ११ वाजता कराची बंदरापासून १२ किमी लांब असताना काही जहाजे असल्याचे निदर्शनात आले.आयएनएस विनाशने आपल्या जवळ असलेली चारही क्षेपणास्त्र सोडली,पहिले क्षेपणास्त्र हे कराची बंदरात असलेल्या केमारी टॅंकच्या आत जाऊन फुटले आणि त्यामुळे एक धमाकेदार स्फोट झाला.दुसरे क्षेपणास्त्र पनामामियान इंधन टँकवर जाऊन फुटले आणि त्यालापण आग लागली.तिसरी आणि चौथ्या क्षेपणास्त्राने ब्रिटिश मालवाहू जहाजाच्या मागे लपून बसलेल्या पीएनएस ढाका ह्या पाकिस्तानी जहाजावर जाऊन फुटली आणि पीएनएस ढाकाचे दोन तुकडे झाले.
आयएनएस विनाशने आपल्या जवळील सर्व क्षेपणास्त्र सोडल्यामुळे भारतीय सर्व नौका परत भारताच्या किनारपट्टीवर जायला निघाल्या.आणि तेच वरून भारतीय हवाई दलाने लढाऊ विमानाने गोळ्यांचा मारा करत राहिले होते ते सर्व कराची बंदर बरबाद करून टाकले,आता फक्त तिथे धुराचा कल्लोळ दिसत होता.ऑपरेशन पायथॉन दरम्यान कराची बंदरावरील तेल आणि दारूगोळाचे सर्व साठे,कोठारे,वखारी,वर्कशॉप सर्वांच्या सर्व उध्वस्त करून टाकले.ह्या दोन ऑपरेशन मध्ये पाकिस्तानचे तीन अब्ज डॉलरचे नुकसान झाले आणि पाकिस्तानचे आर्थिक कंबरडेच मोडले.ज्यातून ते अजूनही सावरे शकले नाहीत.कराची बंदरावरील आग हि ७० किमीपेक्षाही अधिक दुरून दिसत होती,हि आग वीजवायला पाकिस्तानला पाच ते सात दिवस गेले.अशा प्रकारे भारतीय नौसेना आणि भारतीय हवाई सेनेने पाकिस्तानमध्ये दिवाळी साजरी केली.
पुढील भागात भारतीय सेनेचा शेवटचा वार आणि पाकिस्तानचे दोन तुकडे…बांगलादेश स्वतंत्र…….
References :
Indian Navy
Indian Air Force
Indian Army
Ministry Of Defense
भारतीय गुप्तचरसंस्थेची गुढगाथा
Mission R&AW –RK Yadav
Times of India
Tribune
–अभि